अपर तहसिल कार्यालय, संख
ता. जत जि. सांगली

संख हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव जत शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. संख गाव महाराष्ट्र-कर्नाट्क सीमेजवळ स्थित आहे, ज्यामुळे येथील लोक कन्नड भाषा अधिक प्रमाणात बोलतात; तरीही मराठी ही येथील प्रमुख भाषा आहे. हे गाव जतपासून सुमारे ४० किलोमीटर पूर्वेला आणि सांगलीपासून १३० किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

गावाजवळील गुड्डापूर येथील दानम्मा देवीचे देवस्थान प्रसिद्ध आहे, जे संख गावापासून १५ किलोमीटर अंतरावर स्थित आहे. विजापूर येथील गोल घुमट देखील शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर आहे.

संख गावातील लोकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो, कारण येथील भाग दुष्काळी आहे. पाणी आणण्यासाठी लोकांना ५ ते १० मैल प्रवास करावा लागतो.

श्रीमती रोहिणी शंकरदास अपर तहसिलदार, संख, सांगली
मी रोहिणी शंकरदास, अपर तहसिलदार, संख, सांगली म्हणून कार्यरत आहे. माझ्या कार्यक्षेत्रात संख, माडग्याळ, उमदी आणि तिकोंडी या चार महसूली मंडळांचा समावेश आहे.

प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमतेसह लोकसेवा हे माझे मुख्य उद्दीष्ट आहे. महसूली प्रशासन, भू-अभिलेख व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच शासनाच्या विविध योजना आणि धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणे या जबाबदाऱ्या मी पार पाडत आहे.

ग्रामीण आणि शहरी प्रशासनाचा व्यापक अनुभव घेत, मी जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासात्मक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कटिबद्ध आहे. शासनाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रशासन अधिक सुलभ व कार्यक्षम बनवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे.

अपर तहसिलदार कार्यालया मार्फत घेण्यात आलेले कार्यक्रम अधिक पहा
संख अपर तहसीलदार कार्यालय येथे जागतिक योग दिन संपन्न

जागतिक योग दिनानिमित्त संख येथील अपर तहसीलदार कार्यालयात विविध योग क्रियांच्या माध्यमातून आरोग्यवर्धनाचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
संख अपर तहसिलदार कार्यालयामार्फत तिकोंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान यशस्वीपणे घेण्यात आले.

संख अपर तहसिलदार कार्यालयामार्फत तिकोंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान यशस्वीपणे घेण्यात आले.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
‘एक पेड़ माँ के नाम’ उपक्रमाचा महसूल विभाग माडग्याळ (ता. जत) येथे उत्साहात संपन्न

"एक पेड़ माँ के नाम" या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत जत तालुक्यातील माडग्याळ येथे महसूल विभागाच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या मातांचे स्मरण करत वृक्षारोपण केले. पर्यावरण रक्षणाबरोबरच मातृप्रेमाचा सन्मान करणारा हा उपक्रम उपस्थितांना भावविवश करणारा ठरला.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
अपर तहसिलदार कार्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला

अपर तहसिलदार कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महिलांचे सशक्तीकरण, हक्क आणि योगदान यावर विचारमंथन झाले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महिलांना शुभेच्छा देत त्यांचे कार्य गौरवले. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक आणि प्रेरणादायी उपक्रमही राबविण्यात आले.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
एक दिवस बळीराजा सोबत उपक्रम तिकोंडी महसूल मंडळ

तिकोंडी महसूल मंडळाच्या वतीने ‘एक दिवस बळीराजा सोबत’ हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या, नव्या शेती तंत्रज्ञानाची माहिती आणि सरकारी योजनांची माहिती देण्यात आली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि उपाययोजना सुचवल्या. कार्यक्रमात कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच यशस्वी शेतकऱ्यांच्या अनुभवांचे आदानप्रदान करण्यात आले.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
प्रजासत्ताक दिनानिमित्त अपर तहसिल कार्यालय संख आवारात वृक्षारोपण

प्रजासत्ताक दिनानिमित्त अपर तहसिल कार्यालय, संख आवारात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. वृक्षारोपणाद्वारे हरित उपक्रमांना चालना देत, निसर्ग संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी झाडांचे महत्त्व सांगत भविष्यात अधिकाधिक वृक्ष लागवडीचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
सर्व महसूली मंडळामध्ये सुशासन आठवडा साजरा करणेत आला

सर्व महसूली मंडळांमध्ये सुशासन आठवडा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नागरिक सेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले, ज्यामध्ये तक्रार निवारण शिबिरे, शासकीय योजनांची माहिती व जनजागृती अभियान यांचा समावेश होता. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पारदर्शक आणि प्रभावी प्रशासनावर भर देत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या व तत्काळ उपाययोजना केल्या. सुशासनाच्या मूल्यांचा प्रचार करून प्रशासन-जनता यांच्यातील विश्वास दृढ करण्यावर या आठवड्यात विशेष भर देण्यात आला.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
प्रेस नोट्स अधिक पहा